आठवीच्या पुस्तकात चूक; भगतसिंह, राजगुरुंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख, ब्राह्मण महासंघाचा आक्षेप
इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात भगतसिंग, राजगुरु आणि कुर्बान हुसेन हे इंग्रजाशी लढताना फासावर गेले असा उल्लेख आहे. यावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने याला आक्षेप घेतला आहे. पुणे : इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात राज्य शिक्षण प्रसारक मंडळाने चूक केल्याचा दावा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केला आहे. आठवीच्या मराठीच्या पुस्तकात इतिहासकार यदुनाथ थत्ते यांचा लेख छापण्यात आला आहे. यामध्ये भगतसिंग, राजगुरु आणि कुर्बान हुसेन हे इंग्रजाशी लढताना फासावर गेले असा उल्लेख आहे. यावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने याला आक्षेप घेतला आहे. सुखदेव यांचं नाव वगळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी केली आहे. पुस्तकात उल्लेख काय? आठवीच्या अभ्यासक्रमात प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांचा 'भारत माझा देश आहे' या धडा आहे. या धड्यात चूक झाल्याचं समोर आलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु हे तीन क्रांतिकारक फासावर गेल्याचं सगळ्यांनाच माहित आहे. परंतु या धड्यात सुखदेव यांच्याऐवीज कुरबान हुसेन यांचा उल्लेख केला आहे. ...